नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांना जीव घालावा लागतो धोक्यात… पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत

नाशिक : नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हबमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र मानले जाते. अशा या वेगवान शहरात सध्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. महिलांना पन्नास फूट खोल विहिरीतून उतरून, जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.
येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह 41 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या योजना कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे.